Wikipedia

शोध परिणाम

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या स्फुर्तीदायक अद्भुत घटनांचा अभ्यास

शिवरायांचे पराक्रमी क्षत्रीय पूर्वज

शिवरायांचा जन्म सुर्यवंशीय क्षत्रिय कुळात झाला, इतिहासकार सांगतात की अयोध्या प्रांतात शिसोदे नावाचे सुर्यवंशीय राजे राज्य करीत होते. त्यांच्यातील एक पुरुषाने नर्मदा नदीतीरी जाऊन तिथे आपले राज्य संपादन केले. पुढे या राजाला दुसऱ्या राज्यांकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते मेवाड प्रांतात जाऊन राहिले. तिकडे राज्य स्थापन केले, ज्याचे केंद्रस्थान चितोडगड किल्ला होते असे इतिहासकार सांगतात.

पुढे परकीय आक्रमकांच्या टोळधाडी हिंदुस्थानावर कोसळल्या, त्यावेळी या मेवाडातील राजपूत राजांशी त्यांचे अनेक युद्धप्रसंग झाले. त्यानंतर इ.सन तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली, यात राजपुतांनी आपल्या बाणेदार स्वभावाचे दर्शन त्याला दाखवून दिले, त्यांनी आपल्या प्राणाची आहुतीच  रणसंग्रामात दिली. त्यांना अल्लाउद्दीनच्या प्रचंड सेनेपुढे हार पत्करावी लागली.कित्येक रजपूत प्राणांस मुकले.
याच वंशातील देवराजजी महाराणा यवनांच्या त्रासाने जेरीस येऊन त्या प्रांताचा त्याग करून दक्षिणेस आले आणि कृष्णा, भीमा नदीच्या तिराने पाळेगारी करून राहू लागले. दक्षिणेत आल्यानंतर शिसोदे वंशीय राजघराण्याचे पुढे भोसले हे आडनाव झाले. त्यांच्या वंशजांना पुढे तिथल्या गावांच्या पाटीलक्या मिळाल्या. त्याच वंशात पुढे बाबाजी भोसले यांच्या जन्म इ.सन १५३३ त झाला. बाबाजी भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती. मालोजींचा जन्म इ.सन १५५० तर विठोजींचा जन्म १५५३ त झाला. हे दोघेही कर्ते झाल्यानंतर पुढे देवगिरी जवळील वेरूळ गावी येऊन राहिले. त्यानंतर देवगिरीच्याच यादवांचे वंशज असलेलं सिंदखेडचे लखुजीराजे जाधव यांच्या पदरी नोकरी धरली. लखुजीराजे हे निजामशाही सल्तनतीचे एक मोठे सरदार होते. त्यांना निजामशाहीत बारा हजाराची मनसब असून ते सिंदखेडचे देशमुख होते.
    मालोजी राजांच्या अंगचे गुण ओळखून मूर्तिजा निजामशहाने त्यांना लष्करात शिलेदारी दिली. त्याप्रमाणे ते घरची घोडी ठेवून निजमशाहाची नोकरी करू लागले. मालोजी राजांच्या पोटी शहाजीराजे आणि शरीफजींचा जन्म झाला. इ.सन १५९४ साली शहाजी राजांचा जन्म झाला असे इतिहासकार सांगतात.
निजामशाहीत नोकरी करीत असतांनाच मालोजी राजांच्या अंगचे गुण प्रदर्शित होऊन दरबारात योग्यतेस चढून त्यांना जुन्नर, पुणे, सुपे  या भागातील परगण्यांची जहागीर मिळाली.या सर्व घडामोडी इ.सन १६०४ साली घडल्या.
निजामशाहीत कार्यरत असलेल्या लखुजी राजे जाधव आणि मालोजी राजे भोसले यांच्यात सोयरीक होऊन हे एकमेकांचे व्याही झाले, इतिहासकार सांगतात की शिमग्याच्या सणात रंगपंचमीच्या दिवशी सर्व सरदारांना भोजनास बोलावले आणि असताना जिजाऊ आणि शहाजी राजांच्या लग्नाची बोलणी झाली. इतिहासकार सांगतात की या विवाह सोहळ्यास स्वतः बादशाह निजामशहा उपस्थित होता. हा विवाह इ.सन १६०४ च्या एप्रिल महिन्यात दौलताबादेस झाला. मालोजी राजे हुशार आणि कर्तबगार असल्यामुळे त्यांचे निजामशाही दरबारात तेज पडून लागले.
मालोजी राजांना निजामशाहीत मनसब मिळाल्यानंतर शहाजी राजे आपल्या वडिलांबरोबर नेहमी दरबारात जात येत असत. शहाजी राजे हुशार, कुशाग्रबुद्धी, देखणे आणि सुशील होते, त्यामुळे दरबाराच्या लोकांची अमीरउमरावांची त्यांच्यावर मर्जी बसली. पुढे आपल्या या जहागिरीत इमानाने नोकरी करून पंधरा वर्षानंतर इ.सन १६१९ त मालोजीराजे मृत्यू पावले. त्यांच्या नंतर जहागीर आणि मनसब विठोजी राजांनी सांभाळली आणि पुढे शहाजी राजांना मिळाली.

1 टिप्पणी:

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...