Wikipedia

शोध परिणाम

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

शाहजी राजांची आदिलशाहीतील नोकरी

 मागे आपण पाहिलं की, शहाजहानच्या प्रचंड मोठ्या सेनासागराशी झुंज देत असलेल्या शाहजी राजांना अपयश घेऊन आपल्या ताब्यातील मुलुख,किल्ले  शत्रूच्या स्वाधीन करून स्वतःला आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. त्यानुसार ते विजापुरास आले. यावेळी आदिलशहाने त्याच्या सरदारांनी, रणदुल्लाखान, मुरार जगदेव यांनी त्यांचा बहुमान केला. यावेळी मोगलांशी आदिलशहाच्या झालेल्या तहानुसार शाहजी राजांची पूर्वीची जहागीर पुणे, सुपे हे परगणे त्याने शाहजी राजांकडेच कायम केले. त्या परगण्यांची व्यवस्था पाहण्याचं काम शाहजी राजांनी दादाजी कोंडदेव नामक ब्राह्मणास दिले.आणि त्यांच्या पदरी एक हजर स्वार दिले. या स्वारांवर सिद्दी हिलाल याला प्रमुख म्हणून नेमले.

मुरार जगदेवाने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता, शिवरायांनी पुणे पुन्हा बसवुन येथील लोकांची भीती घालवली, यावेळी सोन्याचा नांगर शेतात शिवरायांच्या हाताने फिरवला, यावेळी दादाजी कोंडदेव

    मोगलांकडून आदिलशहास भीमा व निरा या नद्यांमधला प्रांत मिळाला होता, आणि त्याची व्यवस्था लावण्याच्या कामी मुरारपंताने शाहजी राजांना बरोबर घेतले. मुरारपंतांना हे माहिती होते की या प्रदेशाची चांगली माहिती शाहजी राजांना आहे, त्यानुसार त्यांनी या प्रदेशाची व्यवस्था लावली, तेव्हा त्यावेळी मुरार जगदेव यांचा शाहजी महाराजांवर प्रचंड लोभ बसून त्याने आदिलशाहास त्यांची तारीफ केली आणि शिफारस केली कि, असा शूर, मुत्सद्दी, युध्दकलानिपुण पुरुषास सहसा सोडू नये. यानंतर शाहजी राजे विजापुरास जास्त राहिले नाहीत. कर्नाटकातील प्रांतात आपले प्रस्थ वाढवण्यासाठी आदिलशहाने रणदुल्लाखानाची नेमणूक केली आणि त्याच्या मदतीस शाहजी राजांना पाठवले आणि शहाजी राजांना या कर्नाटक प्रांतात जहागीर देण्याचे कबूल केले. पुढील काही दिवसानंतर राजांनी या भागातील जमेदारांस नमवून हा प्रांत आपल्या ताब्यात आणला. त्यानुसार त्यांनी जे परगणे जिंकले होते ते त्यांची जहागीर म्हणून त्यांच्याकडेच ते कायम केले. याप्रमाणे रतनपूर, देवगड, कानकगिरी, व राजदुर्ग हे परगणे शाहजी राजांना जहागिरी दाखल मिळाले.

    यावेळी कर्नाटकद्रविड भागातील या नव्यानेच प्राप्त झालेल्या मुलुखाची व्यवस्था लावणे कठीण काम असल्याचे जाणून आदिलशहाने या कामात तरबेज असलेल्या आणि मलिक अंबरच्या तालमीतले असलेल्या शाहजी राजांना या भागाची सुभेदारी दिली. शाहजी राजांनी या भागातील बेबंदाई मोडून धामधूम नाहीशी करून जिकडेतिकडे चांगला बंदोबस्त केला. पुढे शाहजी राजांनी तंजावर प्रांत सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणला. 

    पुढे शिवाजी महाराजांनी चालवलेल्या धामधुमीत आदिलशहाने शाहजी राजांची शिवाजी महाराजांना फूस असल्याच्या संशयाने जिंजीच्या वेढयात असलेल्या शाहजी राजांना बाजी घोरपडे मुधोळकर आणि अफजलखान यांच्या करवी कैद केली. त्यांना विजापुरात आणले त्यावेळी शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या बादशाहशी पत्र व्यवहार करून आदिलशहावर दबाव आणून शाहजी राजांच्या प्राणावर आलेले हे संकट दूर केले. यानंतर शाहजी राजे विजापुरास चार वर्षे अडकून पडले आणि या काळात शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलुखात कोणतीही धामधूम केली नाही. याप्रमाणे पुढे दरबारी लोकांची आणि आदिलशहा यांचा विश्वास संपादन करून शाहजी राजे पुन्हा कर्नाटकात आले.

    पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे चालवलेले प्रयत्न आणि त्यांचे मिळवलेले यश शाहजी राजांच्या कानी येत होते. परंतु त्यांना शिवाजी राजांनी भेट घेता येत नव्हती कारण शिवाजी राजांची ही सगळी धामधूम आदिलशाही मुलुखात होत होती. पुढे आदिलशाही आणि शिवाजी महाराज यांच्यात तह होऊन थोडी शांतता झाल्यावर शाहजी राजांनी स्वदेशी जाण्याची परवानगी आदिलशहकडून मिळवली. आणि मग शाहजी राजे आणि शिवाजी महाराज या थोर पिता पुत्रांची भेट इ.सन १६६२ मध्ये  जेजुरीत झाल्याचं म्हटलं जातं. यावेळी जिजाऊ, शिवराय, शाहजी राजे, तुकाऊ, व्यंकोजी राजे या सर्व कुटुंबाची एक समवेत भेट झाली. यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर शाहजी राजे कर्नाटकात परत आले.

फर्जंद शाहजी राजे यांची होदेगिरी (कर्नाटक) येथील समाधी

     अशा प्रकारे शाहजी राजे कर्नाटकात परत आल्यानंतर काही दिवसानंतर आदिलशाही मुलुखाच्या बंदोबस्ताच्या कामगिरीवर असता बेदनूर जवळ होदेगिरी म्हणून गाव आहे, तिकडे शिकारीवर असता घोड्याचा पाय वृक्षवेलीत अडकून शाहजी राजे घोड्यावरून पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी त्यांचे वय सत्तर वर्षांचे होते. इ.सन १६६४ च्या २३ जानेवारीत हे वृत्त घडले.

    याप्रकारे शाहजी राजांच्या मृत्यनंतर विजापूरकरांकडून  व्यंकोजी राजांचे सांत्वन होऊन मनसबदारीची वस्त्रे त्यांना मिळाली.

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...