Wikipedia

शोध परिणाम

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

पुन्हा उभारलेल्या निजामशाही तख्ताला संपवण्यासाठी मोगल बादशहा शाहजहान स्वतः दक्षिणेत उतरतो.

 मागील भागात आपण पाहिलं की, शहाजहानने पाठवलेल्या सैन्याचा शाहजी राजांनी दोन वेळा पराभव केला. त्याप्रमाणे शहाजहानने विजापूरकरांना धमकीचे पत्र पाठवले. त्यात त्याने असे सांगितले की शहाजीच्या सोबत तुम्ही जो निजामशाही मुलुख घेतला आहे, तो परत करावा आणि शाहजीला कोणतीही मदत करू नये, आणि असे न केल्यास आम्ही फौजेसह तुमच्यावर चालून येऊ. परंतु रणदुल्लाखान वगैरे विजापुरी मंडळींनी शाहजी राजांच्या बाजूनेच राहणे पसंत केले. 

किल्ले माहुली

     वरील सर्व घडामोडी झाल्यानंतर आदिलशहाने शाहजी राजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेलतेला पाहून शहाजहानने आपल्या सैन्याचे चार भाग केले, त्याने दोन तुकड्या शाहजी राजांवर तर दोन तुकड्या आदिलशहावर पाठवल्या. याप्रमाणे शाहजी राजांच्या कब्जातील सोलापूर ते बेदर आणि कोकणपट्टी पूर्ण शत्रूच्या ताब्यात गेली. यावेळी शाहजी राजे अहमदनगर कडे वळाले. तिकडून त्यांनी मोगलांशी कडवा प्रतिकार केला, त्यांनी यावेळी प्रचंड युद्ध कौशल्य दाखवले. पण शत्रू सैन्य जास्त असल्याने त्यांनी कोल्हापूर कडे धाव घेतली. आणि तिकडे त्यांना विजापुरी सैन्याची साथ भेटून त्यांनी मोगलांची गनिमी कावा पद्धतीने लंगडेतोड चालू केली.

    आशा प्रकारे शाहजी राजे या प्रांतातून तिकडे तिकडून इकडे पळून आणि गनिमी काव्याचा वापर करून लढत राहिले. या सगळ्या धामधुमीत मोगलांच्या सैन्याची प्रचंड खराबी झाली.

    तेव्हा शहाजहानने आपल्या सैन्याला आदेश दिला की, शहाजीच्या मागे लागून आपल्या सैन्याचे खुप नुकसान होते आहे. त्यानुसार त्याच्या फौजेचा मोर्चा विजापुरकडे वळला. आणि मग या एकत्र सैन्याने विजापुरी मुलुखात धामधूम सुरू केली. मोगलांनी विजापुरी प्रांतातील बरेच किल्ले घेतले, प्रांत काबीज केले, शहरे ताब्यात घेतली.

    अशाप्रकारे मोगली सैन्य विजापुरी प्रांतात घुसलेले पाहून आदिलशहाने घाबरून जाऊन मोगलांशी तह केला आणि आपल्यावर आलेले संकट थांबवले. त्याप्रमाणे मोगल आणि आदिलशाह यांनी निजामशाही प्रांत आपापसांत वाटून घेतला, यानंतर मोगलांनी विजापुरकरांना अशी अट घातली की, शाहजी राजे त्यांच्या ताब्यातील सगळे किल्ले , प्रांत मोगलांना देतील तरच त्यांना व त्यांच्या लोकांना शाहजहान माफ करेल, विजापूरकरांनी त्यांना  कोणत्याही प्रकारची मदत किंवा थारा देऊ नये.अशाप्रकारे मोगल आणि विजापूरकर यांच्यात इ.सन १६३६ त तह झाला.

    या तहानंतर मोगलांचा संपूर्ण सेनासागर एकट्या शाहजी  राजांच्या मागे लागला. त्यात मोगलांना विजापुरी सैन्याने मदत केली. दरम्यान या मधल्या काळात शाहजी राजे कोकणात उतरून आपल्या हाताशी असलेला मुलुख स्थिरस्थावर करून माहुली किल्ल्यात राहिले. परंतु मोगलांची फौज प्रचंड असल्याने त्यांचा नाईलाज होऊन त्यांनी किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला आणि मोगलांना आपण केलेल्या सर्व  अपराधांची क्षमा करून मला आपल्या नोकरीत घ्यावे असा अर्ज केला. त्याप्रमाणे मोगल बादशाहने असा जबाब पाठविला की तुम्हाला पूर्वी मन्सब दिली असता तुम्ही बंड करून दिल्लीपदपातशाहीच्या विरोधात गेलात तेव्हा पुन्हा तुम्हाला आमच्या पदरी नोकरी मिळणे नाही, पण तुम्हाला विजापूरकरांच्या नोकरीस राहण्याची परवानगी आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली

 असा जबाब मिळाल्यावर त्यांनी माहुली किल्ल्यावर बसवलेल्या बालराजास बादशाहच्या स्वाधीन करून आपण स्वतः विजापुरास गेले. या सर्व घडामोडी इ सन १६३६ मध्ये घडल्या.

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...